Posts

Showing posts from April, 2025

छत्रपती संभाजी नगर येथील भीमगायिका पंचशीला ताई भालेराव यांचा जामनेरात कार्यक्रम संपन्न.।

Image
छत्रपती संभाजी नगर येथील भीमगायिका पंचशीला ताई भालेराव यांचा जामनेरात कार्यक्रम संपन्न.। जामनेर तालुक्यात भिमगीतांचा जोरदार कार्यक्रम घडवुन आणल्यामुळे संघमित्रा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दादाराव वाघ यांचा सत्कार। एकापेक्षा एक भिमगीते व गायिका पंचशीला ताई च्या आवाजात नाचून उठले भिमसैनिक। मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर  जामनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतीराव फुले,महामानव डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या वतीने दि 27 वार रविवार रोजी प्रबोधनात्मक "शिवराय भीमराय गितांचा जलसा" कार्यक्रम संपन्न करण्यात आला होता.। याठिकाणी सर्वात प्रथम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूण कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली प्रतिमेला पुष्पहार अर्पण कर्तेवेळी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील,भाजपा नगरपरिषद गटनेते व वैद्यकीय आघाडी जिल्हाअध्यक्ष डॉ.प्रंशात भोंडे,भुसावल नगरसेवक जगनभाऊ लोखंडे जामनेर उपपोलिस निरिक्षक किशोर प...

मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते महसूलअधिकारी नियमपुस्तिकेचे अनावरण"

Image
 मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते महसूलअधिकारी नियमपुस्तिकेचे अनावरण"   मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर  मुंबई -राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मा. श्री राजेशकुमार, राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महसूल प्रशासनाच्या सक्षमीकरणासाठी जळगाव जिल्ह्याचा अभिनव उपक्रम  कार्यशाळेतील मुख्य आकर्षण ठरले ते — “महसूल अधिकारी नियमपुस्तिका” या नवोन्मेषी दस्तऐवजाचे मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. ही नियमपुस्तिका  विभागीय आयुक्त कोकण श्री विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी जळगाव श्री आयुष प्रसाद सदस्य असलेल्या समितीने तयार केली आहे. या पुस्तिकेच्या माध्यमातून महसूल अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यातील अचूकता, एकसंधता आणि कार्यक्षमता यामध्ये भरीव मदत होणार आहे. नियमपुस्तिका तयार करणाऱ्या टीममध्ये विशेष सहभाग:...

शहरात प्रभू श्रीराम जन्मोत्सवाची निघणार भव्य मिरवणूक; मंत्री गिरीश महाजन यांचे नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन.।

शहरात प्रभू श्रीराम जन्मोत्सवाची निघणार भव्य मिरवणूक; मंत्री गिरीश महाजन यांचे नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन.। मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर    प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने रविवार, दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी गणेशवाडी, जामनेर येथे एक भव्य व दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ४:३० वाजता शनीमंदिर परिसरातून सुरू होणाऱ्या या मंगल यात्रेत हजारो भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा आहे.या शोभायात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे  मंत्री गिरीश महाजन यांनीही नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. प्रभू श्रीराम हे आपल्या संस्कृतीचे प्राण आहेत. त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्र येऊन भक्ती व एकतेचा संदेश द्यावा, असे ते म्हणाले.या शोभायात्रेचे आयोजन प्रभू श्रीराम जन्मोत्सव समिती (गणेशवाडी), जामनेर तालुका यांच्या वतीने करण्यात आले असून, भक्तिभावाने नटलेल्या वातावरणात प्रभू श्रीरामाच्या चरणी श्रद्धा अर्पण करण्यासाठी सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खास प्रसंगी सहभागी होण्यासाठी आणि आपल्या...

मोठया प्रमाणे भ्रष्टाचार व.ठेकेदारांची मनमानी खाताये तुपाचा मलीदा,त्वरित कार्यवाही होणार का...?

Image
मोठया प्रमाणे भ्रष्टाचार व.ठेकेदारांची मनमानी  खाताये तुपाचा मलीदा,त्वरित कार्यवाही होणार का...?  नाशिक जिल्हा प्रतिनिधी :-डॉ.शेरूभाई मोमीन, येवला        मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर    रस्ता क्र.41पानगव्हाण ते.सवंदगाव ता.वैजापूर जि. औरंगाबाद रस्त्याची काम चालू आहे विहिरीवरचे कच्चे मटेरियल वापरत आहे अत्यंत निकृष्ट काम चालू आहे सर्व,जि.प.पं.स.ग्रा.पं.व.अनेक सर्वच अधिकारी व. लोकप्रतिनिधी मलीदा खाऊन गप्प झालेले आहेत. तरी तात्काळ ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे, या कामात मोठा भ्रष्टाचार होत आहे, सर्वच ठीक -  ठिकाणी, काम पूर्ण पणे कच्या स्वरूपात झाले आहे मुरूम पक्या डबर ची पिचींग नाही, लेव्हल व दबाई नाही पाणी नाही तरी सर्वच भ्रष्टाचार करणाऱ्या वर त्वरित औरंगाबाद जिल्हाधिकारी साहेब व. पालकमंत्री औरंगाबाद यांनी कडक कार्यवाही करावी कडक शासन करून तात्काळ कारवाई करावी त्वरित कारवाई करा सखोल चौकशी द्वारे समिती गठीत करा त्वरित कारवाई करा.अशी मागणी या परिसरातील सर्व ग्रामस्थ व सर्व रहिवाशी वर्ग यांनी निवेदनाद्वारे केली आहेत. भ्रष्टाचार / ...

RTO तपासणी नाका कर्की ता.मुक्ताईनगर येथील उपोषनाची दखल घेणेबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना प्रजाशक्ती क्रांती दलाने दिले निवेदन...।

Image
RTO तपासणी नाका कर्की ता.मुक्ताईनगर येथील उपोषनाची दखल घेणेबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना प्रजाशक्ती क्रांती दलाने दिले निवेदन...।  मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर  प्रतीनीधी : RTO तपासणी नाका कर्की ता. मुक्ताईनगर येथे RTO विभागाच्या काही अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर वसुली केली जाते ह्या संदर्भात २०२३ पासून  RTO विभागाशी पत्र व्यवहार सुरु होता मात्र त्या विषयाकडे RTO विभागाचे अधिकारी हे गांभीर्याने बघतत नाहीत म्हणून त्या अनुषंगाने प्रजाशक्ती क्रांती दलाने दिनांक २८/०३ पासून कर्की ता. मुक्ताईनगर येथे तीन मागण्यांसह साखळी उपोषनाला सुरुवात केली. मात्र RTO विभाग आमच्या मागण्यांना गांभीर्याने घेत नसून दरम्यान च्या काळात तीर्व उष्म लाटेमुळे उपोषणकर्त्याची तबियत खालावल्यामुळे तीनवेळेस उपोषणकर्त्याना तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले त्या अनुषंगाने उपोषणाची तात्काळ दखल घेऊन सरकार दरबारी आपण आमच्या उपोषणाची दाहकता मांडावी ह्या आशयाचे निवेदन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोराज तायडे , राज्य अध्यक्ष पंकज सपकाळे यांनी जळगांव जिल्हाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना...

जामनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतीराव फुले,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त दि.27रोजी प्रबोधनात्मक "शिवराय-भीमराय गितांचा जलसा"

Image
जामनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतीराव फुले,महामानव डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त दि 27रोजी प्रबोधनात्मक "शिवराय भीमराय गितांचा जलसा"  महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भीमगीत गायिका "भीमराज की बेटी" फेम पंचशीलाताई भालेराव। मुख्य संपादक/शांताराम झाल्टे जामनेर  जामनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतीराव फुले आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त प्रबोधनात्मक "शिवराय-भीमराय जलसा" गितांचे आयोजन दिनांक 27/2025रोजी करण्यात येत आहे. हा ऐतिहासिक जलसा 27 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता संघमित्रा बुद्ध विहार, भुसावळ रोड, जामनेर येथे पार पडणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते होणार आहे व याठिकाणी अनेक मान्यवर नेत्यांची उपस्थिती लाभणार आहे.  महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भीमगीत गायिका "भीमराज की बेटी" फेम पंचशीलाताई भालेराव आणि त्यांच्या संचाचे सादरीकरण. त्यांच्या सशक्त आवाजात छत्रपती शिवाजी महाराज, मह...

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तविविध कार्यक्रमांमध्ये डॉ केतकी पाटील सहभागी.।

Image
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांमध्ये डॉ केतकी पाटील सहभागी.। मुख्य संपादक/शांताराम झाल्टे जामनेर  जळगाव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे न्याय, समता आणि बंधुतेचा अनोखा संगम ! दरवर्षी १४ एप्रिल रोजी साजरी होणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे फक्त एक स्मरण दिन नव्हे, तर हा दिवस आहे प्रेरणेचा, परिवर्तनाचा आणि आत्मपरीक्षणाचा. त्यानिमित्त आज जळगाव सह जिल्ह्यातील विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गोदावरी फाऊंडेशन संचालिका डॉ केतकी पाटील ह्या सहभागी झाल्यात. तसेच समाज बांधवांना शुभेच्छा दिल्यात. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास डॉ केतकी पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर शहरातील वसंत स्मृती कार्यालय तसेच  जी एम फाऊंडेशन मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संविधानाचे वाचन तसेच बुद्ध वंदना देखील सामूहिकरीत्या म्हणण्यात आली. यावेळी आमदार राजू...

डॉक्टर बाबासाहेबांची जलनीती स्वीकारून देशाला सुजलाम सुफलाम बनविल : जयसिंग वाघ

Image
डॉक्टर बाबासाहेबांची जलनीती स्वीकारून देशाला सुजलाम सुफलाम बनविल : जयसिंग वाघ  मुख्य संपादक/शांताराम झाल्टे जामनेर  भुसावळ :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शंभर वर्षांच्या पुढचा वेध घेणारे दृष्ट्ये नेते होते , त्यांनी मजूर मंत्री असताना काही मोठ्या नद्यांवर धरणं बांधली , जल विद्युत प्रकल्प उभे केले ,नदीजोड प्रकल्प राबविले , लाखो एकर शेती ओलिताखाली आणली , शेती करिता पुरेसे पाणी व वीज उपलब्ध करून दिले त्यामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती घडून आली त्यांची जलनीती आजही सरकारने वापरली तर देशात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही असे अभ्यासपूर्ण विचार ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले . भुसावळ रेल मेल सर्व्हिस कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यवक्ता म्हणून भाषण करतांना ते बोलत होते. जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की , भारतात आजही शेतकरी आत्महत्या करत आहेत , कुपोषण मोठ्याप्रमाणात आहे , भूकबळी लोकांची संख्या वाढत आहे , शेतीचे क्षेत्र कमी करून काँक्रीटीकरण वाढविले जात आहे यामुळे देश अधोगतीकडे जात आहे , ब...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग जळगाव येथे उत्साहात साजरी...।

Image
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग जळगाव येथे उत्साहात साजरी...। मुख्य संपादक/शांताराम झाल्टे जामनेर  दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून वंदनाने झाली. या कार्यक्रमात प्राचार्य प्रा. विशाखा गणवीर, प्रा. अश्विनी वैद्य, प्रा. प्रियदर्शनी मून, प्रा. पियुष वाघ व डॉ. केतकी पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य  शिवानंद बिरादार यांची विशेष उपस्थिती होती. सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित भाषण, कविता व गीत सादर केली. बाबासाहेबांच्या "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" या संदेशाचे स्मरण करत, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन विद्यार्थ्यांनी उत्साहाने केले व संपूर्ण परिसरात जयंतीचा प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.

मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांमुळे पहुर येथे रेल्वे मालधक्का मंजूर...‌।

Image
मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांमुळे पहुर येथे रेल्वे मालधक्का मंजूर...‌।  राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जामनेरचे आमदार मा.गिरीशभाऊ महाजन यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा प्रयत्नांना यश.। विकासाच्या दिशेने मोठे पाऊल मुख्य संपादक/शांताराम झाल्टे जामनेर  जामनेर विधानसभा मतदारसंघातील पहुर येथे रेल्वे मालधक्का (Goods Terminal) उभारण्यासाठी केंद्र शासनाने अधिकृत मंजुरी दिली असून, या निर्णयामुळे पहुर व परिसरातील ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकल्प संपूर्ण भागाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या महत्वाकांक्षी योजनेसाठी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जामनेरचे आमदार मा.गिरीशभाऊ महाजन यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. दिल्लीमध्ये रेल्वे मंत्रालयाशी वेळोवेळी चर्चा करून, पहुर परिसरातील गरजा व त्यातून होणाऱ्या संभाव्य लाभांची ठोस मांडणी केली. त्यांच्या या अथक प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. रेल्वे मालधक्क्यामुळे स्थानिक शेतकरी, व्यापारी व उद्योजक यांना माल वाहत...

"जयभीम पदयात्रा" जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्साहात संपन्न...।डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रमांचे आयोजन.।

Image
"जयभीम पदयात्रा" जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्साहात संपन्न...। डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रमांचे आयोजन.। मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर   जळगाव -- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, मेरा युवा भारत, आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने "जयभीम पदयात्रा" या विशेष उपक्रमाचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे करण्यात आले. या कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रविंद्र नाईक, जिल्हा कोषागार अधिकारी श्री. राजेंद्र खैरनार, जिल्हा युवा अधिकारी श्री. नरेंद्र डागर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे श्री. प्रणव झा, महानगरपालिका अधिकारी आणि समाजकल्याण विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. पदयात्रेत ५०० हून अधिक विद्यार्थी, शासकीय अधिकारी व कर्मचारी, वसतिगृहातील विद्यार्थी, NCC कॅडेट्स आणि खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पदयात्रेला प्रारंभ करण्यापूर्वी डॉ. बाबासाह...

“धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान” बाबत जळगांव येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी घेतली आढावा बैठक...।

Image
“धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान” बाबत जळगांव येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी घेतली आढावा बैठक...। मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर  *जळगांव* येथील *जिल्हा नियोजन सभागृह* येथे *जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद* यांच्यासह आज *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी *“धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान” (धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान)* योजनेचा आढावा घेऊन योजना योग्यरित्या राबविणे बाबत सबंधित अधिकाऱ्यांना योग्यत्या सूचना केल्या. *प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी* यांनी 2 ऑक्टोबर 2024 रोजी *“धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान”* योजनेचा प्रारंभ केला. मोहिमेचे उद्दिष्ट देशतील महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांतील 63,000 हून अधिक *आदिवासी बहुल* गावांना विकेंद्रीकरण प्रदान करण्याचे आहे. मोहिमेअंतर्गत, 17 मंत्रालयांचे समन्वित प्रयत्न पुढील 5 वर्षांत 25 योजनांवर लक्ष केंद्रित करतील. *धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान* चे उद्दिष्ट सामाजिक पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, उपजीविकेतील गंभीर कमतरता दूर करणे आणि भारत सरकारच्या 17 मंत्रालय...

केंद्रीय भाजप कार्यालय नवी दिल्ली येथे संविधान निर्माते भारतरत्न डॉ.भीमराव आंबेडकर 'सन्मान अभियान' मोहिम संपन्न।

 केंद्रीय भाजप कार्यालय  नवी दिल्ली   येथे संविधान निर्माते भारतरत्न डॉ.भीमराव आंबेडकर 'सन्मान अभियान' मोहिम संपन्न। या मोहिमेत राष्ट्रीय कार्यशाळा सत्राचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.जे.पी.नड्डा जी यांच्या हस्ते उद्घाटन.।  यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची उपस्थिती।  *भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर 'सन्मान अभियान'*  या मोहिमेअंतर्गत, *भारतीय जनता पक्ष* १४ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून *बाबा साहेब* यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवणार आहे. संविधानाची निर्मिती साकार करून, बाबासाहेबांनी देशाच्या सर्वांगीण विकासाचा आणि कोट्यवधी लोकांच्या उन्नतीचा मार्ग मोकळा केला आहे.  आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी* यांच्या नेतृत्वाखाली, आमच्या सरकारने बाबा साहेबांशी संबंधित स्थळे *'पंच तीर्थ'* म्हणून विकसित करण्यासाठी अभूतपूर्व काम केले आहे. त्यांच्या महान तत्वांचे अनुसरण करून, आज *भाजपा 'विकसित भारत'* चा संकल्प साध्य करण्यात प्रयत्नशील आहे. प्रत्येक घटकाचा विकास आणि सामाजिक सलोखा हे *भाजपा* चे ध्येय आहे.