हिंदू धर्म रक्षणी राज राजेश्वरी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त गावपातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महीलांना पुरस्कार...

हिंदू धर्म रक्षणी राज राजेश्वरी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त गावपातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महीलांना पुरस्कार...
मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर 
 बभळाज ग्रामपंचायत च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच महाराष्ट्र शासन  महिला बालकल्याण विभाग अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त सामाजिक आणि गावपातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महीला, शासनाच्या विविध योजना सर्व ग्रामस्थांपर्यंत पुरवुन आपली ओळख निर्माण केलेल्या महीलांना पुरस्कार म्हणुन प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले़
1)आरोग्य सेविका एम.एम गौंडर यांना लोकनियुक्त सरपंच  योगिता बाई अजमल जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
 2) अंगणवाडी सेविका यमुनाबाई भुरा राठोड यांना उपसरपंच संजय पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले 3) अंगणवाडी सेविका उषा दिलीप धनगर यांना तंटामुक्ती अध्यक्ष छोटू सिंग राजपूत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले 
4) अंगणवाडी सेविका माया चिंतामण भालेराव यांना मधुकर सुका भिल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले 5)आशा वर्कर्स रंजनाबाई भाईदास पवार यांना किशोर प्रकाश गुजर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 6)आशा वर्कर्स प्रमिला रवींद्र पवार यांना अर्जुन विश्राम कोळी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले 7)आशा वर्कर्स भारती दुर्योधन पवार यांना रवींद्र बाबूलाल बंजारा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले 8) आरोग्य सेविका कोमल अरविंद वंजारी यांना प्रदीप पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी माजि सरपंच मगण आप्पा मराठे माजी तंटामुक्त अध्यक्ष अजमल भाऊ जाधव तसेच पोलीस पाटील नितीन भाऊ जाधव, शिवसेनेचे पदाधिकारी पिंटू भाऊ शिंदे बळीराम देवा जाधव तसेच मानव अधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट नई दिल्ली महाराष्ट्र युवा प्रभारी दीपक भाऊ चोरमल ज्येष्ठ पत्रकार अनिल भाऊ त्रिभुवन आबासाहेब भिसे , बळीराम भाऊ धनगर शिरसाट ,सर्व ग्रामपंचायत सदस्य ,वि.वि.का.स. सोसायटीचे सदस्य, गावातील विविध क्षेत्रातील आजी माजी पदाधिकारी,गावकरी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

अस्तित्वात नसलेल्या मंदिरासमोर होतेय ४५ लाखांच्या सभामंडपाचे काम...।