वनखात्याच्या‌ आशिर्वादानेच अवैध वृक्षतोड? –खात्याच्या दुर्लक्षामुळे पर्यावरण धोक्यात...

वनखात्याच्या‌ आशिर्वादानेच अवैध वृक्षतोड? –खात्याच्या दुर्लक्षामुळे पर्यावरण धोक्यात...

मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर 

दि.१९:–वरणगांव (भुसावळ) | प्रतिनिधी 

गावच्या व परिसरातील हद्दीतील राखीव जंगल व सार्वजनिक जमिनींवरील हिरव्यागार डेरेदार झाडांची मोठ्या प्रमाणावर अवैध तोड सुरू असुन,यामध्ये वनखात्याचे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.दिवसाढवळ्या झाडे कापली जात असतांना संबंधित खात्याचे कर्मचारी शांत का?असा संतप्त सवाल पर्यावरण प्रेमी विचारत आहेत.

**मिळालेल्या माहितीनुसार,अज्ञात ठेकेदार व स्थानिक टोळ्यांमार्फत शासनाचा कुठलाही परवाना न घेता मोठ्या प्रमाणावर लिंब,साग,बाभूळ,सिसु,खैर यांच्यासारख्या मौल्यवान झाडांची कत्तल (खुन)होत असुन ही लाकुड दिवसाढवळ्या ट्रॅक्टरद्वारे नेली जात आहेत.या हालचालीकडे वनविभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.देशाच्या जनतेने  भोगलेल्या कोरोनासारख्या महामारीत निसर्गागाने ऑक्सिजनची आवशक्यता काय असते मानवसृष्टी जगविण्यासाठी वृक्षांनपासुन मिळणाऱ्या ऑक्सिजनची कमी भासली होती त्यावेळी शासनाचे धोरण मोठ्या प्रमाणात

वृक्षारोपण करण्यात यावी अशे धोरण अवलंबिले होते शासनाच्या जबाबदार कर्मचाऱ्यांना याचा विसर पडला व ते सर्रास वृक्षतोडीला पाठबळ देतांना दिसून येत आहे.एप्रिल मे च्या उन्हाळ्यामध्ये वरणगांव व‌ परिसरात सर्वाधीक उष्णतेचा पारा ४७ ते ४८अंशापर्यंत पाहायला मिळाला हे मानवजिवनसृष्टीसाठी हे धोक्याचे संकेत आहे तसेच अति उष्माघाताने कित्येक लोकांना आपला जिव गमावावा लागला आहे याला ही अवैध वृक्षतोड कारणीभूत असते


**वनखात्याच्या मूक संमतीशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणे शक्य नाही**असे मत फुलगांवचे सामाजिक कार्यकर्ते श्री.मिलिंद महाजन यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले या प्रकराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावेत,हीच आमची मागणी आहे.सदर अवैध वृक्षतोडीमुळे परिसरातील पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे,तसेच भुमीधुप,जलसंकट आणि जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे.झाडांच्या तोडीमुळे पशुपक्ष्यांचे अधिवास उध्वस्त होत आहेत.जिल्हा प्रशासन व वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाकडे लक्ष देतील का?हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Comments

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

अस्तित्वात नसलेल्या मंदिरासमोर होतेय ४५ लाखांच्या सभामंडपाचे काम...।