तीन अपत्य असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.०२ येथे कर्तव्यावर असलेले(भांडारपाल)एन.एस.सोनवणे तिसरे अपत्य बाबत शासनाची दिशाभूल करून करताय डोळे झाक...

तीन अपत्य असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.०२ येथे कर्तव्यावर असलेले(भांडारपाल)एन.एस.सोनवणे तिसरे अपत्य बाबत शासनाची दिशाभूल करून करताय डोळे झाक...
सोनवणे सोनवणे असल्यामुळे सोनवणे यांना वाचवण्याचा प्रयत्न
तर सुरू नाही ना सोनवणेंचा? 

अधीक्षक अभियंता यांच्याकडे तक्रार करूनही कोणती कारवाई नाही तिसरे अपत्य असणाऱ्या श्री सोनवणे ला घालताय पाठीशी निलंबनाची कारवाई करा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी ,हेमकांत गायकवाड
मुख्य संपादक शांताराम झाल्टे 
दिनांक.२३/०४/२०२५ रोजी भारतीय रजिस्टर पोस्टद्वारे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ यांच्याकडे तीन अपत्य असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक.०२ येथे कर्तव्यावर विराजमान असलेले भांडारपाल स्टोअरकीपर एनएस सोनवणे यांची चौकशी करून योग्य ती नियमोचित कारवाई करणे बाबत तक्रार अर्ज केला होता परंतु अद्याप पर्यंत २० ते २५ दिवसाचा कालावधी होण्यात आलेला असून तरी देखील अर्जाबाबत कोणतीही दखल व कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही नियमानुसार शासनाने दिलेल्या साधारण अर्जावर सात ते आठ दिवसावर कारवाई होणे अनिवार्य असून देखील ही कोणतीही कारवाई झालेली नाही तरी यावरून असे समजावे लागेल का श्री एन एस सोनवणे यांना तिसरे अपत्य असल्याबाबत कार्यालयाधीक्षक कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता यांना वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना व शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू नाही ना यांची आर्थिक संगणमत होऊन यांच्यावर कारवाई न होऊ नये यांना कारवाई पासून वंचित तर ठेवत नाही ना यामुळे तर प्रलंबित नाही ना असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होण्यासारखे आहे.
सार्वजनिक बांधकाम मंडळ जळगाव अंतर्गत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.०२ या कार्यालयात भांडारपाल (स्टोरकीपर) या पदावर एन.एस.सोनवणे हे मागील २०१५ ते आजपावेतो भांडारपाल (स्टोरकीपर) या पदावर विराजमान असून भांडारपाल (स्टोरकीपर) एन एस सोनवणे यांना मागील पाच ते दहा वर्षापासून यांचे तिसरे अपत्य असल्याची माहिती शासनापासून लपवून ठेवलेली आहे व सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. ०२ आणि शासनाची दिशाभूल करून जनतेचा ही विश्वास घात केलेला आहे व आतापर्यंत दुसऱ्या इच्छुक भांडारपाल (स्टोरकीपर) उमेदवार देखील अडथळा निर्माण झालेला आहे तसेच आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. ०२ आणि शासनाची दिशाभूल करून लाखो रुपये मिळविलेले मानधन व शासकीय सवलतीचा उपभोग बेकायदेशीर रित्या घेतलेला आहे व उपभोगत आहे तरी अशा शासनाची व जनतेच्या दिशाभूल करणाऱ्यावर नियम व अटी धाब्यावर बसवून भांडारपाल (स्टोरकीपर) या पदावर विराजमान होऊन लाखो लाखो रुपये घशात घालणारे भांडारपाल (स्टोरकीपर) यांची चौकशी करून योग्य ती दडात्मक कारवाई करण्यात यावी बेकायदेशीर रित्या काम करणाऱ्यावर व कर्मचारी यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर उचित कारवाई करावी आणि तसेच तीन अपत्य असताना ही त्यांना दोन अपत्य असल्याबाबत खोटी माहिती दिली आहे व शासन सूचना दिनांक. २८/०३/२००५ चे उल्लंघन केलेले असे समजते श्रीमती स्वाती खुशालराव जोगदंड अधीक्षक जिल्हा कारागृह वर्ग दोन उपाध्यक्ष मध्यवर्तीय कारागृह पर्यावरण दिनांक. १५/०३/२०१२ पासून रुजू झाल्या होत्या यांनी शासन सेवेत नियुक्तीपूर्वीच तीन अपत्य आहे अशी त्यांनी खोटी माहिती दिल्याचे सिद्ध झाले होते तीन अपत्य असल्याबाबत खोटी माहिती दिली व शासन अधिसूचना दिनांक. २८/०३/२००५ नंतर सिद्ध झाल्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र नागरि सेवा वर्तवणूक (शिस्त व अपील) अधिनियम १९७९ च्या ८ खाली करण्यात आलेल्या विभागीय चौकशीमध्ये दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने शासकीय सेवातूनही शिक्षा मा उच्च न्यायालय मुंबई येथील रिट याचिका क्र.५१४५/२०१९ सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात आलेले आहे तरी मग का? सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.०२ येथे कार्यरत असलेले भांडारपाल (स्टोरकीपर) यांना अ‌द्याप पर्यंत सेवेतून बडतर्फ का करण्यात येऊ नये असा प्रश्न निर्माण होत आहे. अधीक्षक अभियंता हे कारवाई करण्यासाठी कोणत्या गोष्टीची वाट बागताय? अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ जळगाव यांच्या आशीर्वादानेच या ठिकाणी कार्यरत आहे म्हणून तरच कारवाईसाठी दिरंगाई केली जाते आहे व कानाडोळा केला जात आहे यांचे आर्थिक संगनमत असल्याने यांच्यावर कारवाई होत नाही की काय? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होण्यासारखे आहेत ना? तसेच आजपर्यंत घेतलेल्या मानधन रक्कम वसूल करण्यात यावी व भांडारपाल (स्टोरकीपर) एन एस सोनवणे यांना बडतर्फ करून नवनियुक्त भांडारपाल (स्टोरकीपर) यांची नेमणूक करण्यात यावी. तरी योग्य ती उचित नियमोचित कारवाई करण्यात यावी.अशा आशयाचे पत्राद्वारे ऑल इंडिया ब्लू टायगर सेना तथा स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

अस्तित्वात नसलेल्या मंदिरासमोर होतेय ४५ लाखांच्या सभामंडपाचे काम...।