बिलवाडी येथे वीज पडून महिलेचा मृत्यू – चार लाखांची शासकीय मदत शासन निर्णयानुसार मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या दिली जाणार...।

बिलवाडी येथे वीज पडून महिलेचा मृत्यू – चार लाखांची शासकीय मदत शासन निर्णयानुसार मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या  दिली जाणार...। 
जन क्रांती लाईव्ह न्यूज 
 बिलवाडी, तालुका जामनेर येथील श्रीमती हिराबाई गजानन पवार (वय ३५ वर्षे) यांचा दिनांक ११ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुःखद असून संबंधित कुटुंबावर अचानक ओढवलेला हा आघात लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा जलसंपदा मंत्री मा.ना.गिरीश महाजन यांनी देखील याची तत्काळ दखल घेतली असून, प्रशासनाला आवश्यक त्या मदतीचे निर्देश दिलेले आहेत. त्यांच्या सूचनेनुसार मदत कार्य अधिक गतीने राबवले जात आहे.

आज दिनांक १२ मे २०२५ रोजी मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या घरी भेट देण्यात आली. या वेळी तहसीलदार जामनेर, पोलीस निरीक्षक पहूर, स्थानिक पदाधिकारी, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. त्यांनी घटनेचा आढावा घेतला आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले.

नैसर्गिक आपत्ती निवारण निधी अंतर्गत शासकीय नियमानुसार रु. ४,००,०००/- (चार लाख रुपये) इतकी आर्थिक मदत शासन निर्णयानुसार देय आहे. सदर रक्कम संबंधित कुटुंबास लवकरात लवकर वितरित करण्यात येईल. मदत वितरणाची प्रक्रिया सध्या सुरू असून लवकरच ती पूर्ण होणार आहे.

प्रशासन मृतात्म्यास श्रद्धांजली अर्पण करतेवेळी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होते.

Comments

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

अस्तित्वात नसलेल्या मंदिरासमोर होतेय ४५ लाखांच्या सभामंडपाचे काम...।