गोदावरी खोऱ्यातीलपाण्याचा उपयोग अजिंठा डोंगररांगातून उगमपावणा-या उत्तरवाहीनी नद्यांना व्हावा---श्री.अर्जुनभोई सर (मुंबई समाज भुषण सन्मानित)
गोदावरी खोऱ्यातील
पाण्याचा उपयोग अजिंठा डोंगररांगातून
उगमपावणा-या उत्तरवाहीनी नद्यांना व्हावा---
श्री.अर्जुनभोई सर (मुंबई समाज भुषण सन्मानित)।
जन क्रांती लाईव्ह न्यूज
मुंबई प्रतिनिधी:-
कालच तापी मधून
उत्तर महाराष्ट्राची तृप्ती मेगा पुनर्भरण योजनेवर करार झाला, मागील काळात गुजरात राज्यासोबतचा नार व पार नद्यांच्या पाण्याचा उपयोग नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यातील तलावात साठवण करून त्याचा उपयोग सदर जिल्ह्यातील शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून केलेला करार आजही आठवणीत आहे. जलसंपदा विभागा अंतर्गत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक नाशिक येथे संपन्न होऊन २०२७ साली नियोजित असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आढावा घेतला गेला आहे. आम्ही अपेक्षा करत आहोत की, गोदावरीखोऱ्यातील काही जलस्रोत हा अजिंठा डोंगररांगातून उगम पावणाऱ्या आणि उत्तरवाहीनी असलेल्या नद्यांमध्ये सोडल्यास त्याचा उपयोग या दुष्काळग्रस्त भागातील शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी निश्चित होईल यात शंका नाही.
अजिंठा डोंगररांगातून उगम पावणाऱ्या व उत्तरवाहीनी असलेल्या नद्यांमध्ये नांदगाव व चाळीसगांव तालुक्यातून वाहणारी मणियार नदी, कन्नडच्या घाटातून ४०च्यापरिसरात वाहत येणारी नदी, नगरदेवळा परिसरातून वाहत जाणारी नदी, घाटनांद्रा परिसरातून वठाण पुढे पाचोराबाहेरपुरा परिसरातून वाहत पुढे जाणारी नदी, पिंपळगाव हरेश्वरजवळून उगम पावणारी नदी, सोयगाव परिसरातून उगम पावणारी सोनद नदी, अजिंठ्याच्या लेणीजवळून उगम पावणारी वाघुर नदी, तोंडापूर- टाकरखेडा परिसरातून वाहणारी कांगनदी यांच्यामध्ये गोदावरी खोऱ्यातील पाण्याचे पुनर्भरण सिल्लोड कन्नड परिसरातून केले तर निश्चितच या दुष्काळग्रस्त भागातील शेतीच्या पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल आणि त्यासाठी सदर विभागातील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षाही अर्जुनभोई यांनी आमच्या प्रतिनिधीकडे केली.
Comments
Post a Comment