ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावविकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची माहिती जाणून घेण्यासाठी आंबीलहोळ ग्रामपंचायतची घेतली क्षेत्रभेट...।

ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावविकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची माहिती जाणून घेण्यासाठी आंबीलहोळ ग्रामपंचायतची घेतली क्षेत्रभेट...।
 मुख्य संपादक/शांताराम झाल्टे 

जामनेर -गावाच्या विकासाला वाहून घेणाऱ्या ग्रामपंचायतला भेट देऊन ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावविकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची माहिती जाणून घेत गावकारभाराचे आपले कुतूहलही शमविले. शालेय अभ्यासक्रमातील क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत शिक्षक श्री.योगेश रामधन बावस्कर यांनी विद्यार्थ्यांची आंबीलहोळ ग्रामपंचायत कार्यालयाला भेट घडवून आणली. 
       दिलीप चव्हाण व पालक शत्रुघ्न  पवार यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनात घोंगावणाऱ्या अनेक शंकांचे निरसन दिलीप चव्हाण, शत्रुघ्न पवार यांच्याकडून करून घेतले. गावविकासासाठी मिळणारा निधी, घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर यांची आकारणी व वसुली याबाबत विद्यार्थ्यांनी चिकित्सक प्रश्न विचारले. ग्रामपंचायतमध्ये असलेले विविध अभिलेख व करभरणा रजिस्टर , जन्म मृत्यू याची नोंद यांचा कृतीतून  अभ्यास केला.
   गावविकासाच्या नव्या संकल्पनाही विद्यार्थ्यांना सांगितल्या. संगणकीय कामकाजाची माहिती यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. यावेळी उपशिक्षिक विजय कोळी योगेश बावस्कर  यांच्या सह पायल राठोड, कोमल चव्हाण, प्राची चव्हाण, रोहन चव्हाण, कृष्णा राठोड ,महेश चव्हाण, कृष्णा चव्हाण, नैतिक चव्हाण, निलेश पवार ,निखिल चव्हाण, रोहित चव्हाण, रितेश चव्हाण ,हर्षल चव्हाण, जीवन चव्हाण ,आदी विद्यार्थ्यांनी चर्चे संदर्भात सहभाग घेतला होता.

Comments

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

अस्तित्वात नसलेल्या मंदिरासमोर होतेय ४५ लाखांच्या सभामंडपाचे काम...।