जळगावात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आगमन ..ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते स्वागत।

 
 दि. 9 महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज संध्याकाळी 9 सप्टेंबर रोजी जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या आगमनाच्या वेळी जळगावच्या वातावरणात एक उत्साही आणि सन्माननीय उत्सवाचे वातावरण तयार झाले. राज्यपालांच्या स्वागतासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विशेष पुढाकार घेतला आणि त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.

या प्रसंगी खासदार स्मिता वाघ, आमदार चिमणराव पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, आणि महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनीही उपस्थित राहून राज्यपालांचे स्वागत केले.विमानतळावर राज्यपालांना जिल्हा पोलिस दलाकडून मानवी सन्मानदंना देण्यात आली. 

या आगमनाने जळगावमध्ये एक वेगळा रंग भरला असून, जिल्ह्यातील नागरिकांमध्येही या दौऱ्याबाबत मोठी उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण आहे. राज्यपाल राधाकृष्णन यांचा हा दौरा जिल्ह्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.।

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।