वनखात्याच्या आशिर्वादानेच अवैध वृक्षतोड? –खात्याच्या दुर्लक्षामुळे पर्यावरण धोक्यात...
वनखात्याच्या आशिर्वादानेच अवैध वृक्षतोड? –खात्याच्या दुर्लक्षामुळे पर्यावरण धोक्यात... मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर दि.१९:–वरणगांव (भुसावळ) | प्रतिनिधी गावच्या व परिसरातील हद्दीतील राखीव जंगल व सार्वजनिक जमिनींवरील हिरव्यागार डेरेदार झाडांची मोठ्या प्रमाणावर अवैध तोड सुरू असुन,यामध्ये वनखात्याचे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.दिवसाढवळ्या झाडे कापली जात असतांना संबंधित खात्याचे कर्मचारी शांत का?असा संतप्त सवाल पर्यावरण प्रेमी विचारत आहेत. **मिळालेल्या माहितीनुसार,अज्ञात ठेकेदार व स्थानिक टोळ्यांमार्फत शासनाचा कुठलाही परवाना न घेता मोठ्या प्रमाणावर लिंब,साग,बाभूळ,सिसु,खैर यांच्यासारख्या मौल्यवान झाडांची कत्तल (खुन)होत असुन ही लाकुड दिवसाढवळ्या ट्रॅक्टरद्वारे नेली जात आहेत.या हालचालीकडे वनविभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.देशाच्या जनतेने भोगलेल्या कोरोनासारख्या महामारीत निसर्गागाने ऑक्सिजनची आवशक्यता काय असते मानवसृष्टी जगविण्यासाठी वृक्षांनपासुन मिळणाऱ्या ऑक्सिजनची क...