Posts

Showing posts from February, 2025

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्या बाबत आवश्यक तो कायदा करावा : जयसिंग वाघ

Image
महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्या बाबत आवश्यक तो कायदा करावा : जयसिंग वाघ  ------------------------------------------------ मुख्य संपादक/शांताराम झाल्टे जामनेर  जळगाव :-  बिहार येथील  जगप्रसिद्ध महाबोधी महाविहार आजही बौद्धांच्या ताब्यात नसल्याने बौद्ध संस्कृतीचे जतन , संवर्धन करणे कठीण होत आहे ,अन्य धर्मीय लोक तिथं त्यांची पूजा अर्चा , धार्मिक विधी करतात तसेच पर्यटकांना चुकीची माहिती देतात .   महाविहार हे बौद्ध जनतेच्या पूजेचे ,  श्रद्धेचे , भावनांचे स्थळ असल्याने ते बौद्धांच्याच ताब्यात असणे आवश्यक आहे त्या करिता आवश्यक तो स्वतंत्र कायदा बिहार सरकारने  करावा असे स्पष्ट प्रतिपादन साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.            महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणी करिता पंधरा दिवसांपासून जगभरातील शेकडो बौद्ध भिख्खू बुद्धगया येथे आंदोलन करीत आहेत त्या आंदोलनास पाठिंबा म्हणून जळगाव येथील अजिंठा हाउसिंग सोसायटी तर्फे राष्ट्रपतींना जळगाव जिल्हाधिकारी यांचे मार्फत  एक...

बौद्ध वधू , वर मेळाव्यास गुजरात , मध्य प्रदेश येथूनही मिळाला प्रतिसाद....।

Image
बौद्ध वधू , वर मेळाव्यास गुजरात ,  मध्य प्रदेश येथूनही मिळाला प्रतिसाद....। ................................................................ मुख्य संपादक/शांताराम झाल्टे जामनेर  जळगाव :-  जळगाव येथील सैनिकी सभागृहात आयोजित बौद्ध वधू वर परिचय मेळाव्यात गुजरात , मध्य प्रदेश याच बरोबर महाराष्ट्रातील मराठवाडा , विदर्भ , मुंबई या भागातील २१७  मुला मुलींनी आपला परिचय करून दिला .            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक संजय इंगळे होते त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की आपण आता सरकारी नोकरीची अपेक्षा सहसा ठेवू नये , लहान लहान उद्योग सुरू केले , खाजगी नौकरी मिळविली तरी आर्थिक प्रगती होत असते , संसारात समाधान सर्वात मोठी बाब आहे , आपण समाधान नाही मानले तर आपला संसार सुखाचा होऊच शकणार नाही .        प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी आपल्या समाजात आजही काही जुन्या रुढी , परंपरा पाळल्या जातात , बौद्ध धर्माच्या विवाह विधीत आम्ही एक सुत्रता ठेवत नाही , खूप उशीरा लग्न लावणे , लग्नावर अनावश्यक आर्थिक खर्च ...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३४ व्या जयंतीची भिमनगरची समिती जाहीर...।

Image
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३४ व्या जयंतीची भिमनगरची समिती जाहीर...।                      [ अध्यक्ष सचिन अनिल सुरवाडे, उपाध्यक्ष प्रशांत भिवसन सुरवाडे, खजिनदार राहुल चंद्रकांत इंगळे] मुख्य संपादक/ शांताराम झाल्टे जामनेर                                                              विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती देशात नव्हे तर जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याच निमित्ताने जामनेर भिमनगर मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती उत्सव साजरा करण्यासाठी समिती गठीत केली गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२५ च्या अध्यक्ष सचिन अनिल सुरवाडे, उपाध्यक्ष प्रशांत भिवसन सुरवाडे, खजिनदार राहुल चंद्रकांत इंगळे,सचिव महेंद्र भिमराव रणीत,सहसचिव आदर्श इंगळे, कार्याध्यक्ष सौरव अवचारे,हिशेब तपासणीस शुभम जंजाळे, पवन जंजाळे, सल्ल...

पिंपळगाव खुर्द येथे नारीशक्ती महिला बचत गट "भावेश दाल मिल" चे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्घाटन...।

Image
पिंपळगाव खुर्द येथे नारीशक्ती महिला बचत गट "भावेश दाल मिल" चे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्घाटन...। पिंपळगाव खुर्द (भुसावळ)येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान कक्ष पं.स.भुसावळ अंतर्गत नारीशक्ती महिला बचत गट यांचे नव्याने सुरु होणाऱ्या "भावेश दाल मिल"चे आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी स्थानीक ग्रामस्थांसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह सौ.रजनी सावकारे, स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, भाजपा पदाधिकारी, तालुका-जिल्हा कृषी अधिकारी महिला व नारीशक्ती महिला बचत गटाचे सदस्य उपस्थित होते.

पहूर येथे उद्या महाशिवरात्रीनिमित्त यात्रा उत्सव !श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर परिसर यात्रेसाठी सज्ज !

Image
पहूर येथे उद्या महाशिवरात्रीनिमित्त यात्रा उत्सव ! श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर परिसर यात्रेसाठी सज्ज !  मुख्य संपादक/शांताराम झाल्टे जामनेर  पहूर , ता . जामनेर ( ता . २५ ) जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात पहूर -शेंदुर्णी मार्गावर देवळी आणि गोगडी या पवित्र नद्यांच्या संगमावर  वसलेल्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर पंचक्रोशीतील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असून जागृत देवस्थान आहे .मंदिराच्या जिर्णोद्धार आणि परिसर विकासासाठी शिवभक्त रंगनाथ महाराज यांच्या अथक परिश्रमातून भाविकांच्या सहकार्याने ट्रस्टच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत .        २२ फेब्रुवारी पासून येथे संगीतमय शिवमहापुराण कथेसह अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास  मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे .  उद्या बुधवारी ( ता . २६ ) महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर येथे  छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर  यात्रोत्सवाचे आ...

अंबरनाथ येथील नव्याने बांधलेल्या नाट्यगृहास साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे-- लहुजी परिवर्तन सेना.।

Image
अंबरनाथ येथील नव्याने बांधलेल्या नाट्यगृहास साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे-- लहुजी परिवर्तन सेना.। अंबरनाथ नगरपालिका उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांना निवेदन। मुख्य संपादक/शांताराम झाल्टे जामनेर  आज लहुजी परिवर्तन सेना संस्थापक अध्यक्ष दिपक सोनोने, राज्य उपाध्यक्ष समाधान अंभोरे, शैलेंद्र रुपेकर, आबासाहेब साठे, राहुल अंभोरे, रवि सोनोने, राजू बांगर, यांनी अंबरनाथ नगरपालिका उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांची भेट घेवून लहुजी परिवर्तन सेनेच्या माध्यमातून निवेदन सादर केले  निवेदनात म्हटले आहे की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जगद्विख्यात साहित्यिक असून त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून येथील दिन दलित शोषीत पिडीत यांचे दुःख लेखनाच्या माडले आहे तथा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सुद्धा त्यांच्या मोलाचे योगदान आहे रशिया देशांमध्ये प्रथम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाडा गावून तेथील जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला होता अशा महान साहित्यकाराचा नाट्य निर्मात्यांची लोकशाहिराचे नाव अंबरनाथ नगरपरिषदेने बांधलेल्या नाट्यगृह देण्यात यावे अश...

जामनेर पंचायत समिती येथे नऊ हजार आठशे वीस लाभार्थ्यांना प्रधानमंत्री घरकुल आवास योंजनेचा लाभ...।

Image
जामनेर पंचायत समिती येथे नऊ हजार आठशे वीस लाभार्थ्यांना प्रधानमंत्री घरकुल आवास योंजनेचा लाभ...। घरकूल लाभार्थं्यांच्या खात्यात प्रत्येकी पंधरा हजार जमा.। मंजूर पत्र वाटप कर्तेवेळी सर्व पंचायत समिती पदाधिकारी.। टाकळी खूर्द गावातील लोक नियुक्त सरपंचाच्या प्रयत्नांमुळे बावन्न घरकूल लाभार्थं्यांना मिळवून दिला लाभ //लाभार्थ्यांमध्ये प्रसन्नता.। मुख्य संपादक/शांताराम झाल्टे जामनेर               प्रधानमंत्री घरकुल टप्पा क्रमांक दोन मध्ये देशात एकूण वीस लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे आदेश देण्यात आले असून त्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील पंचायत समिती मार्फत 9820 प्रधान मंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले। यावेळी एकूण सात हजार सातसे चवळेचाळीस लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता पंधरा हजार रुपये जमा करण्यात आला व लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात टाकळी खूर्द गावातील लोक नियुक्त सरपंच जितेंद्र माळी यांच्या प्रयत्नांमुळे यश प्राप्त झाल्याने आज रो...

सौ.सुवर्णा संदीप तायडे(जळगाव) यांना रमाई आंबेडकर पुरस्काराने सन्मानित...।

Image
सौ.सुवर्णा संदीप तायडे(जळगाव) यांना रमाई आंबेडकर पुरस्काराने सन्मानित...। मुख्य संपादक/शांताराम झाल्टे जामनेर  परिवर्तन एक लोक चळवळीचे पंधरावे राज्यस्तरीय अधिवेशन दिनांक २२फेब्रुवारी वार शनिवार रोजी संध्याकाळ ४ वाजता देविका लोंखडे हॉल सुभाष टेकडी उल्हासनगर ४ येथे आयोजित करण्यात आले। अधिवेशनावेळी माजी अतिरिक्त जिल्हा अधिकारी पुरस्कार निवड समिती सहसचिव माननीय आय.एम.मोरे सहसचिवालय मंत्रालय मुंबई यांच्याद्वारे सौ.सुवर्णा संदीप तायडे(जळगाव) यांना रमाई आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुवर्णा मॅडम यांचा सत्कार ही करण्यात आला.। यावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ.मिलींद रणबीर यांच्या नेतृत्वात कार्यक्रम पार पाडण्यात आला। या कार्यक्रमात अनेक मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून मा.सुरेखा गायकवाड़ यांच्या संवेदना काव्यसंग्रहांचे प्रकाशन आणि मान्यवरांचे मार्गदर्शन करण्यात आले।  उपस्थित स्वागताध्यक्ष प्रदीप ढोके माजी क्रिडा जिलाधिकारी,गौरवमुर्ती मां.वंसत गवई माजी जिलाधिकारी,उद्घाटक मां.डॉ.गोकुळदास अहिरे प्रख्यात इएनटी सर्जन, मा.जिल्हाधिकारी मुंबई प...