Posts

Showing posts from November, 2024

जामनेर पोलिस स्टेशन चे कर्तव्य दक्ष पोलिस उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांना पोलिस अधीक्षकांकडून प्रशंसापत्र देऊन सन्मानित...।

Image
जामनेर पोलिस स्टेशन चे कर्तव्य दक्ष पोलिस उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांना  पोलिस अधीक्षकांकडून प्रशंसापत्र देऊन सन्मानित...। संपादक -शांताराम झाल्टे  जामनेर – विधानसभा निवडणुकीच्या काळात जामनेर-पहूर रस्त्यावर नाकाबंदी दरम्यान प्रभावी कामगिरी करत उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांनी चारचाकी वाहनातून तब्बल ₹17,26,400 रोख रक्कम जप्त केली होती. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ न देता, शांततेत आणि सुरळीत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात त्यांच्या समर्पण व कठोर परिश्रमांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र पोलीस दलाला अभिमान वाटत असून, त्यांच्या सेवेची दखल घेत पोलिस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते जयसिंग राठोड यांना प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांचे अभिनंदन करण्यात आले व भावी काळातही अशीच उत्कृष्ट सेवा बजावण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.पोलिस दलाच्या उज्ज्वल परंपरेला अभिवृद्धी करणाऱ्या जयसिंग राठोड यांच्या कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ...

मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी मतमोजणी आवश्यक :--तुषार गांधी

Image
मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी मतमोजणी आवश्यक : तुषार गांधी  जामनेर/ शांताराम झाल्टे  जळगाव :- भारतात निवडणुका दीर्घ स्वरूपात घेणे व काही दिवसांच्या अंतराने मतमोजणी करणे यावर निवडणूक आयोग जोर देत असतो मात्र यातून लोकशाही कमकुवत होत जाते , सत्ताधारी याचा गैरफायदा घेत असतात , मतदाराच्या मताचे अवमूल्यन होते तेंव्हा मतदानातील गैरप्रकार टाळण्यासाठी मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी मतमोजणी आवश्यक आहे असे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले.       भारत जोडो अभियान व सिव्हिल सोसायटी तर्फे दिनांक १८ नोव्हेंबर रोजी गणेश कॉलनी , जळगाव येथे  आयोजित पत्रकार परिषदेत गांधी बोलत होते .        पत्रकार परिषदेस संबोधित करतांना गांधी यांनी सांगितले की आज देशात संविधान धोक्यात आहे , मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली जात आहे , मुलींची सुरक्षितता धोक्यात आहे , जातीय , धार्मिक तेढ वाढविली जात आहे , एकाच उद्योगपतीच्या हितासाठी साऱ्या देशाला वेठीस धरले जात आहे , महाराष्ट्राला कंगाल करून इथले विविध उद्योग गुजरातला नेले जात आहे हे थांबविण्यासा...

जामनेर शहरात पोलिस ठाण्यासमोरून मनीष शर्मा यांची बुलेट मोटरसायकलची चोरी! चोरांचे पोलीसांना खुल्ले आव्हान...?

Image
जामनेर शहरात पोलिस ठाण्यासमोरून मनीष शर्मा यांची बुलेट मोटरसायकलची चोरी! चोरांचे पोलीसांना खुल्ले आव्हान...? जामनेरात चोरीच्या प्रमाणात वाढ.। जामनेर/शांताराम झाल्टे  जामनेर: जामनेर शहरात मोटरसायकल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातील सर्वात धक्कादायक घटना 11 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. भुसावळ रोड पोलीस स्टेशनसमोरून मनीष किसन शर्मा यांच्या घरासमोर उभी असलेली बुलेट मोटरसायकल (MH-19, BY-4161) अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. घटनेचे तपशील: मनीष शर्मा हे नेहमीप्रमाणे जळगाव रोडवरील आपले दुकान बंद करून रात्री उशिरा घरी आले. त्यांनी बुलेट मोटरसायकल घराजवळ पार्क केली. मात्र, काही वेळानंतर गाडी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने आसपासच्या परिसरात शोध घेतला, परंतु गाडीचा थांगपत्ता लागला नाही. यानंतर त्यांनी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार नोंदवली. पोलीस ठाण्यासमोर चोरीची घटना धक्कादायक ही घटना जामनेर पोलीस ठाण्यासमोर घडल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश...